कवडसा ३१ (जसा भीषण समरात विजय, तप्त ग्रीष्मात शीतल वर्षाव , तसा घोर तिमिरात चंद्रप्रकाश म्हणजेच कवडसा) कहाणी एका संघर्षाची सुरु …३१ स्टाफ शीतल ला रूम मध्ये आणून सोडतो आणि आशाताई सर्व तयारी झाली याची खात्री करून मुलाला फोन करतात. इकडे शीतल थोडी उदास असते कारण आता योगेंद्रची भेट कधी होईल हे सांगता येत नव्हत. पणएक समाधान होत कि निदान त्याचा फोन नं तरी मिळाला होता. याच विचारात ती असताना अचानक आईचा आवाज तिच्या कानी पडतो. आशाताई : अग चल निघायचय लवकर, विचार कसला करतेस आता शीतल : (पटकन तन्द्रि भंग होऊन) अं अं .... हो मी तयारच आहे आशाताई : कसल्या विचारात होतीस. अग 3 वेळा हाक मारली मी . शीतल : काही नाही हे दोन महीने कसे गेले त्याचाच विचार करत्ये. आशाताई : आता नको विचार करुस. आता पुढचा विचार कर शीतल : आता आपण, ........ आशाताई : आता तू आमच्या घरी येतेस. तिथे तू पूर्ण बरी होइ पर्यन्त राहाशील. मग तुझ्या घरी शीतल : अग पण...... आशाताई तिच्याकड़े रागाने बघतात श...