Skip to main content

Posts

Showing posts from November, 2016

कवडसा ३१

कवडसा ३१ (जसा भीषण समरात विजय, तप्त ग्रीष्मात शीतल वर्षाव ,  तसा घोर तिमिरात चंद्रप्रकाश म्हणजेच कवडसा)   कहाणी एका संघर्षाची सुरु …३१ स्टाफ शीतल ला रूम मध्ये आणून सोडतो आणि आशाताई सर्व तयारी झाली याची खात्री करून मुलाला फोन करतात. इकडे शीतल थोडी उदास असते कारण आता योगेंद्रची भेट कधी होईल हे सांगता येत नव्हत. पणएक समाधान होत कि निदान त्याचा फोन नं  तरी मिळाला होता.  याच विचारात ती असताना अचानक आईचा आवाज  तिच्या कानी पडतो. आशाताई :  अग चल निघायचय लवकर, विचार कसला करतेस आता  शीतल : (पटकन तन्द्रि भंग होऊन) अं अं .... हो मी तयारच आहे  आशाताई : कसल्या विचारात होतीस. अग 3 वेळा हाक मारली मी .  शीतल : काही नाही हे दोन  महीने कसे गेले त्याचाच विचार करत्ये.   आशाताई : आता नको विचार करुस. आता पुढचा विचार कर शीतल : आता आपण, ........   आशाताई : आता तू आमच्या घरी येतेस. तिथे तू पूर्ण बरी होइ पर्यन्त राहाशील. मग तुझ्या घरी  शीतल : अग पण......   आशाताई तिच्याकड़े रागाने बघतात  श...

जगण्याचा अर्थ

जगण्याचा अर्थ  मनाजोगतं मिळत नाही म्हणून रुसण्यात अर्थ नाही  मिळेल तेच स्वीकारण्यातसूद्धा कसलाच स्वार्थ नाही  कधीच काही मिळालं नाही म्हणून निराश होऊ नका  चंद्र हाती नाही आला म्हणून काजवाहि सोडू नका  उगाच काही जगत आहोत अस वाटून घेऊ नका  सुमार आयुष्य म्हणजे काटेच असं काही समजू नका  तूझे ते दुःख आहे दूसर्याचे ते सोप्पे असं नसत आयुष्याभर प्रत्येकाला कधीच मध मिळत नसत  म्हणून आला प्रत्येत क्षण  तू झाच समजून जग तू  मिळणार्या   प्रत्येक संधीच सोन करून सोड तू  तू झा तूच आहेस आणि  तू झच कर्म  तू ला फळेल  जे धान्य पेरशील तू तेच उगवून हाती मिळेल  म्हणून उगाच आधार तू नको शोधूस भलत्याचा  एक ध्येय एक विचार मार्ग नकोच पाळत्याचा  सुटतील सर्व कोडी उघडतील सर्व दार नक्की  तू झं कर्म कर तू फळ मिळेल देतो खात्री पक्की  कवी : प्रसन्न आठवले